विविध मागण्यांचे समाज कल्याण आयुक्तांना निवेदन - महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे.
जनसंघर्ष न्यूज
नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक 29 मे 2026 शुक्रवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी नाशिक विभागाचे समाजकल्याण उपायुक्त श्री.माधव वाघ यांची भेट घेऊन निवेदन दिले..
निवेदनाचा विषय असा आहे की समाजकल्याण खात्यामार्फत दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील भूमिहीनांना जमिनी दिल्या जातात परंतु सरकारच्या जाचक अटी मुळे नाशिक विभागात प्रकरण मंजूर होत नाहीत त्यामुळे जाचक अटी रद्द करून प्रकरणे तातडीने मंजूर करा तसेच मुखेड ता. येवला येथील सत्याग्रह स्मारकाचे अर्धवट काम पूर्ण करा या व अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले..
याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, निफाड तालुका अध्यक्ष संतोषभाऊ शेजवळ, तालुका उपाध्यक्ष भारत जाधव, गणेश अहिरे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे, रोहित अहिरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!
