मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची मागणी.

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याची मागणी.






जनसंघर्ष न्यूज 

धुळे – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना विविध निमशासकीय, शासकीय कार्यालये तसेच आउटसोर्सिंग (कंत्राटी) भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य व युवा प्रशिक्षणार्थी संघटना, साक्री तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, राज्यातील सांगली, जालना, रायगड व जळगाव जिल्ह्यांप्रमाणे धुळे जिल्ह्यातही प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक आदेश काढावेत. शासनाच्या ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित उद्योग व आस्थापनांमध्ये संधी देण्याची तरतूद असून त्याची प्रभावी अंमलबजावणी धुळे जिल्ह्यातही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास १४ ऑगस्ट २०२६ रोजी मानव मित्र संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी भरत पवार, सुरज गावित, गणेश भामरे, सविता अहिरे, विजय माळी, धर्मा पिपळे, मुकेश कोळी, भास्कर पगारे, चेतन पाटील, आनंद पवार, सोनाली ठाकूर, अनिता कुंवर, सुप्रिया भामरे आदी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

शिरढाने प्र. डांगरी येथे वीज कोसळून गाय ठार शासनाने मदत द्यावी - शेतकरी समाधान पाटील

 

शिरढाने प्र. डांगरी येथे वीज कोसळून गाय ठार शासनाने मदत द्यावी - शेतकरी समाधान पाटील 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी 

धुळे तालुक्यातील शिरढाने प्र. डांगरी येथील शेतकरी समाधान पाटील यांची गाय वीज कोसळून ठार झाली आहे. यासंदर्भात शेतकरी पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळविले आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

पुढील वृत्त असे कि, धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे नद्या, नाल्याना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच दि. 31 जुलै शुक्रवार रोजी पहाटे झालेल्या पावसात धुळे तालुक्यातील शिरढाने प्र. डांगरी येथील शेतकरी समाधान पाटील यांच्या शेती परिसरात बांधलेल्या गायीवर वीज कोसळली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची शेतकरी पाटील यांनी प्रसासकीय अधिकारी तलाठी यांना माहिती. तरी तलाठी यांनी तत्काळ प्राथमिक अहवाल लिहून घेतला आहे. 

प्रतिक्रिया - 

माझ्या शेतात बांधलेली गायीचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. माझे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी. 

समाधान पाटील, शेतकरी ( शिरढाने प्र. डांगरी )

लेबल: ,

मंगळवार, २८ जुलै, २०२६

पाटचारीचे काम पूर्ण करण्यासह सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडा, अन्यथा आंदोलन ; कापडणेतील शेतकऱ्यांचा इशारा.

पाटचारीचे काम पूर्ण करण्यासह सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडा, अन्यथा आंदोलन  ; कापडणेतील शेतकऱ्यांचा इशारा.









जनसंघर्ष न्यूज 

तालुक्यातील कापडणे व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सोनवद प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पांझरा नदीवरील पाटचारीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची मागणी करत जिल्हा प्रशासन आणि सिंचन ( पाटबंधारे) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की रेल्वे प्रशासनाच्या कारणामुळे पाटचारीचे खोदकाम करण्यात आले असून संरक्षक भिंतीही तोडण्यात आल्या आहेत.मात्र संबंधित काम अद्याप पूर्ण झालेले नाही.यामुळे सोनवद प्रकल्प भरण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .प्रकल्प भरला नाही तर कापडणे व परिसरातील हजारो नागरिकांच्या पुढील आठ महिन्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता भिती व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पाटचारीची तत्काळ संयुक्त पाहणी करावी. संरक्षक भिंत व पाटचारीचे काम तातडीने पूर्ण करावे. सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची हमी देणे , संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची चौकशी करून आवश्यक कारवाई करणे तसेच कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प वेळेत भरण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाची जबाबदारी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर शरद पाटील, दिलीप पाटील,योगेश पाटील,कल्पेश पाटील,नवल पाटील,भगवान पाटील, भिका पाटील,उत्तम माळी , प्रकाश चौधरी,कल्पेश पाटील, जयवंत पाटील , प्रभाकर पाटील ,प्रकाश पाटील,प्रल्हाद पाटील,चिंधू लोहार,प्रकाश माळी,प्रशांत पाटील,आबा पाटील,विलास पाटील,संजय जैन ,मनोहर माळी, दीपक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सोमवार, २७ जुलै, २०२६

दिल्लीतील यशानंतर धुळ्यात विद्यार्थ्यांची भव्य 'विजय तिरंगा रॅली'; राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी.

 

दिल्लीतील यशानंतर धुळ्यात विद्यार्थ्यांची भव्य 'विजय तिरंगा रॅली ' ; राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी.

जनसंघर्ष न्यूज 

​धुळे: नवी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या ऐतिहासिक यशानंतर त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धुळे शहरात 'तिरंगा संघर्ष समिती'च्या वतीने एका भव्य 'विजय तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरून मार्गस्थ झाली. या लक्षवेधी रॅलीमध्ये तब्बल ६०० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज सर्वांचे आकर्षण ठरला असून, यात विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रस्त्यावर मोठे शक्तीप्रदर्शन केले.

​दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा हा लोकशाहीतील विद्यार्थी एकजुटीचा मोठा विजय असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. याच विजयाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातही 'टीईटी'सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या गैरप्रकारांचा संताप व्यक्त करत, आता राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीही तातडीने राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी या रॅलीतून करण्यात आली आहे. हा लढा इथेच थांबणार नसून, विद्यार्थ्यांच्या या वाढत्या रोषामुळे आणि राज्य सरकारला दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे आता राज्याचा शिक्षण विभाग यावर कोणती ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

लेबल: ,

बुधवार, २२ जुलै, २०२६

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे तीव्र निषेध

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे तीव्र निषेध.




.





जनसंघर्ष न्यूज 


दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यावर आणि पालकांवर करण्यात आलेला निर्दयी लाठीहल्ला हा जालीनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा ठरला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना या हल्ल्याच्या तीव्र निषेध करीत असून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात तीव्र आंदोलन सुरू करेल. असा इशारा देत आज धुळ्यात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस अजितसिंग राजपुत यांनी केंद्र सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दात विरोध नोंदवला.
येथील क्यूमाईन क्लब समोर मनसेच्या  पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत दिल्लीतील लाठीमार आणि विरोधकांवरील पोलीस कारवाईचा निषेध केला.यावेळी मनसेच्या नेत्या प्राची कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम ,जिल्हा सरचिटणीस अजितसिंग राजपुत,संदीप जडे,तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी, राजेश दुसाणे, दीपक बच्छाव, रामकृष्ण वाघ,योगेश पाटील, मनविसेचे गौरव गिते,विजय मिस्तरी,हर्षल यादव , देवा कोळी ,नितीन कोळी,सचिन खोपडे,मोहन राजे शिंदे,ईश्वर वाघ,सतीश पाटील,बापू जगन्नाथ ठाकूर,अमोल जगन्नाथ ठाकूर,योगेश सैंदाणे, शामक दादाभाई, उज्वला कोतवाल ,आदी आंदोलनात सहभागी झाले.

मंगळवार, २१ जुलै, २०२६

कारवाई; तीन मोटारसायकल चोर जेरबंद, दोन गुन्ह्यांची उकल


 चाळीसगावरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन मोटारसायकल चोर जेरबंद, दोन गुन्ह्यांची उकल

दोन चोरीच्या मोटारसायकली व २० हजारांची रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एक आरोपी फरार

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - चाळीसगावरोड पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना निष्पन्न केले असून, त्यांच्याकडून दोन चोरीच्या मोटारसायकली व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उमर इरफान मन्सुरी व फरदीन शेख लतीफ या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली.

या कारवाईत चोरीच्या दोन मोटारसायकली (एकूण किंमत १ लाख रुपये) तसेच २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील हमीद रशीद अन्सारी हा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

लेबल:

सोमवार, २० जुलै, २०२६

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..


सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

जनसंघर्ष न्यूज 

धुळे- महान पर्यावरणवादी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे पुरस्कर्ते तसेच मेगसेसे पुरस्काराने सन्मानित सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंच, धुळे यांच्या वतीने सोमवार दि. २० जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. निट पेपरफुटी प्रकरण तसेच शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात सोनम वांगचुक यांनी लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने उपोषण सुरू केले होते. मात्र, शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून १८ जुलै रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना उपचाराच्या कारणास्तव ताब्यात घेतल्याचा तसेच आंदोलनातील कार्यकर्त्यांनाही अवमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पुरोगामी विचार मंचाने केला. या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर योग्य कारवाई करावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी पुरोगामी विचार मंचाचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे उपाध्यक्ष गो. पी. लांडगे, प्रा. बाबा हातेकर, जी. डी. जाधव, पंडित गोसावी, पी. टी. बेडसे, मनोहर मोहीते, कॉ. एल. आर. राव, बी. ए. पाटील, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, हेमंत मदाने, विश्वास पगार, डॉ. पापालाल पवार, दरबारसिंग गिरासे, किशोर शेजवळ, एम. एच. मोहीते, गुलाब मोरे, रामकृष्ण शिंदे, बबनराव वानखेडे, दिपक सोनवणे, दिनेश निमोणकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, तालुका सचिव कैलास देसले, तालुकाध्यक्ष नितीन जाधव आदी उपस्थित होते. तसेच मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, नवल ठाकरे, मोहंमद जैद, आसिफ शेख, सादिक शेख यांच्यासह संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल: ,