रस्त्यावर व्यवसाय करणारे 70 टक्के व्यावसायिक हिंदू , अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय सहन केला जाणार नाही- शिवसेना उबाठाचे आयुक्तांना निवेदन

0


 रस्त्यावर व्यवसाय करणारे 70 टक्के व्यावसायिक हिंदू , अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय सहन केला जाणार नाही....

 शिवसेना उबाठाचे आयुक्तांना निवेदन 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - महानगरपालिका क्षेत्रात धुळे शहराची आठ वर्षांपूर्वी हद्दवाढ झाली. यात  अकरा गावांचा समावेश झाला. शासकीय नोंदीनुसार हद्दवाढीपूर्वी शहराची लोकसंख्या सरासरी अडीच ते तीन लाख होती. हद्दवाढीमुळे संबंधित गावांची सरासरी ८५ ते ९५ हजार लोकसंख्या धुळे शहराला जोडली गेली. त्यामुळे शहराची एकूण लोकसंख्या पावणेचार लाखांवर पोचली. ती सरासरी आता सुमारे साडेचार लाखांपर्यंत आहे. तसेच हद्दवाढीपूर्वी शहराचा परिघ सरासरी ४६.४६ चौरस मीटर होता, तो आता सरासरी १०१.०८ चौरस मीटर आहे. स्वाभाविकपणे शहराचे क्षेत्र वाढल्याने भविष्यातील वेध घेऊन वाहतुकीसह अनेक प्रश्न सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, राजकीय व सामाजिक पक्ष, संघटनांना हाताळावी लागणार आहे. त्यातील दुर्लक्षाची चूक महागात पडू शकते याच्या अगोदर धुळे शहरात छोट्या मोठ्या कारणांमुळे अगोदरच मोठ्या मोठ्या जातीय दंगली व कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सतत बिघडत राहतील व येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने अदृश्य शक्तींची कायदा सुव्यवस्था बाधित करण्यासंबंधी गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे शहराचा वातावरण दूषित होत आहे. धुळे शहरात रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले भाजीवाले फळ वाले हे 70 टक्के हिंदू असून यात 30 टक्के मुस्लिम बांधव आहेत, अतिक्रमणाच्या नावाखाली वाहतूक व्यवस्थेच्या आड होणार हिंदू फेरीवाल्यांवरील अन्याय सहन करण्यापलीकडचे असून गेल्या चार दिवसात हिंदू व्यवसायिकांना हजारो रुपयांचा तोटा झालेला आहे,याची जाणीव ठेऊन नियोजनावर भर देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जुना मुंबई- आग्रा महामार्गा लगत चाळीसगाव रोड चौफुली, बारापत्थर, गल्ली क्रमांक चार, तहसील कार्यालय, जेल रोड, आग्रा रोड, नेहरू चौक, पंचवटी परिसर, दत्तमंदिर चौक, साक्री रोड, शिवतीर्थ, अंजनशाह दाता दर्गा, गांधी पुतळा, नगरपट्टी पारोळा रोड मार्केट यार्ड परिसर, गुरुद्वारा, शंभर फुटी डी मार्ट परिसरया ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.धुळे महानगरपालिका क्षेत्रातील शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी  अनेक वर्षापासून मागणी होत आहे.विविध राजकीय संघटना व सामाजिक सतत मागणी त्यात विविध उपाययोजना सुचविल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे.या उपाययोजनांची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. त्यावरून धुळे शहराचा वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी किती गांभीर्याने उपायय योजना होतात हे सिद्ध होते. शहरात पार्किंग, हॉकर्स व नो हॉकर्स झोनसह रहदारीच्या प्रश्न जटिल होत आहे. 

ज्या रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे ते त्वरित काढणे, रस्त्यांवर बांधकामाचे साहित्य न ठेवणे, अवजड वाहनांचा शहरात प्रवेश व बेकायदेशीर पार्किंग, मोकळ्या जागांवर हॉकर्स झोन ठरवणे, आरटीओ, वाहतूक शाखा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिका-यांनी संयुक्त पाहणी करून नव्याने रिक्षा थांबे निश्चित करणे, हातगाडीवर व्यवसाय करणा-यांना रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही, अशी कायमस्वरूपी जागा देणे आदी उपाययोजनांचा धुळे महानगरपालिकेने फेर आढावा घेऊन 

,अगोदर फेरीवाल्यांचे पर्यायी जागावर जाण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या मग त्यानंतर कायमस्वरूपी सोय महानगरपालिका क्षेत्रातील त्यांना कोण कोणते रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासंदर्भात कायमस्वरूपी धोरण निर्माण करावे, धुळे शहराचा केंद्रबिंदू असलेल्या पाच कंदील परिसर असो की शहरातील इतर परिसर कायमस्वरूपी फेरीवाला आणि जेवढे ही मोठे अतिक्रमण असतील हे त्वरित काढा याला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहेच, पण अगोदर फेरीवाल्यांचे शंभर टक्के पुनर्वसन किंवा पर्यायी जागा द्या त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं छोट्या व्यवसाय करणाऱ्या धुळेकर नागरिकांचा आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान होणार नाही व चुकीच्या मार्गात करून गुन्हेगारी मार्गात जाणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेण्याची गरज आहे. यासाठी धुळे शहराच्या गंभीर होत असलेल्या कायदा सुव्यवस्था वा अतिक्रमण व फेरीवाल्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी तातडीची पोलीस विभाग , महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व  फेरीवाला संघटनेची बैठक आयोजित करण्यात यावी,व या कामी दिरंगाई न करता उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे, हिंदू वरील अन्याय शिवसेना उभा टाकावी सहन करणार नाही अशा आशयाचे  निवेदन जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे, प्रशांत भदाने, संदीप सूर्यवंशी, निंबा मराठे सुनील पाटील, आण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, अजय चौधरी, संदीप चौधरी, निलेश कांजरेकर, सागर निकम, अनिल शिरसाट, विष्णू जावडेकर, अरुण पाटील,तेजस सपकाळ आदींनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)