बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात केला जाहीर सत्कार
जनसंघर्ष न्यूज
धुळे प्रतिनिधी - सिध्दार्थ मोरे
धुळे :- जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जयहिंद हायस्कूल सलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन श्री. निलेश पाटील होते. प्रमुख उपस्थितीत शालेय समिती सदस्य डॉक्टर नितीन काकडे, श्री. भूषण सावंत, सदस्या श्रीमती भारतीताई भामरे, प्राचार्य श्री. डी. व्ही. निकम, उपप्राचार्या श्रीमती करंदीकर, पर्यवेक्षक श्री. बिपिन सोनवणे, प्रवीण बोरसे व संजय देवरे ,प्रा एस एस चौधरी सर आदी उपस्थित होते.यावेळी विज्ञान शाखेत संयुक्त प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. गीतांजली ठाकरे व कु. निरीक्षा टोणेपे, प्रथमेश अहिरराव, आदित्य भावसार, तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वाणिज्य शाखेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. गरिमा छाजेड, द्वितीय वेदांत भट्टड, तृतीय कृष्णा बागड,व कला शाखेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. अनम पिंजारी, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या रेणुका चौधरी, तृतीय क्रमांक यमन खान यांचाही गौरव करण्यात आला.
संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “कठोर परिश्रम, शिस्त व सातत्य यांच्या जोरावरच हे यश मिळते,” असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी भर पडली असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
