केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांना समाजभूषण सुभाष बोराडे यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन
केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांना समाजभूषण सुभाष बोराडे यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन
कुंभमेळा नियोजन समितीत समावेश, समाजभूषण पुरस्कार देशभर लागू करण्यासह पाच प्रमुख मागण्या; सकारात्मक आश्वासन
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक येथील देवळाली कॅम्प सिंधी पंचायत समिती हॉल येथे दि. २६ जून २०२६ रोजी केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांच्या शासकीय दौऱ्यादरम्यान समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांनी विविध सामाजिक व प्रशासकीय मागण्यांचे निवेदन सादर केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थींना सदस्य म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशातील सर्व राज्यांमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सुरू करावा, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय नाशिक महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कायमस्वरूपी नोकरभरती करावी, नाशिक महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व शाळांचे पुनर्वसन करून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून द्यावे, तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांनी निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या शासन स्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांना केंद्रीय समितीवर सदस्य म्हणून संधी मिळावी यासाठीही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी रिपाई (आठवले) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे, संजय जाधव, आकाश घुसळे, रोहित सुनील भालेराव, विक्रांत बागुल, जेष्ठ नेते जमिलभाई सैय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजसेवक उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर राजीव बिरसिंग रजोरा, भगवान कटारिया, राकेश बैद, संजय कल्याणी, निलेश बंगाली आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, सामाजिक



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ