मुख्याध्यापक पदावनती व वेतन कपात प्रकरणी विजय चौधरी आक्रमक; धुळे आदिवासी विभागाकडे तक्रार
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, राजकीय न्यूज, राज्य, समस्या, सामाजिक
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, समस्या
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, राजकीय न्यूज, शहर, समस्या, सामाजिक
![]() |
| मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली पावसाळ्यापूर्वी शहरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याबाबतचे निवेदन अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना सादर करताना पदाधिकारी |
जनसंघर्ष न्यूज
धुळे : शहरातील रस्त्यांवरील गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील मुख्य रस्ते तसेच कॉलनी परिसरातील अनेक रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालकांना ते वेळेवर लक्षात येत नाहीत. त्यामुळे अचानक ब्रेक लावावे लागून वाहन चालकांचा तोल जाण्याची शक्यता वाढत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने लहान-मोठे अपघात घडत असून वाहनांचे नुकसानही होत असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. आता पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात रस्ते ओले असल्याने अचानक ब्रेक लावल्यास वाहने घसरण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी “मी धुळेकरचे" अध्यक्ष निरंजन भतवील, दिनेश वाघ, छोटू भाऊ पोतदार, फरदीन शेख, आफ्रिदी शेख आदी उपस्थित होते.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, समस्या, सामाजिक
लेबल: सामाजिक
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, राजकीय न्यूज
लेबल: कार्यक्रम, जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, राजकीय
लेबल: जनसंघर्ष न्यूज, शैक्षणिक
जनसंघर्ष न्यूज
धुळे : वाढत्या उन्हाळ्यामुळे पक्ष्यांना पाणी व अन्नाची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर मी धुळेकर संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी मातीच्या वाडग्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम अँड. चैतन्य भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. तसेच अनेक झाडे सुकल्याने पक्ष्यांना पाणी व अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घरांच्या छतांवर व अंगणात पक्ष्यांसाठी पाणी व दाण्यांची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी जाणीव, आपुलकी आणि पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने रवींद्रनाथ टागोर शाळा येथील विद्यार्थ्यांना मातीचे वाडगे वाटप करण्यात आले. यावेळी अँड. चैतन्य भंडारी यांनी विद्यार्थ्यांना निसर्गासाठी पक्ष्यांचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने पक्ष्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे संचालक विनायक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास निरंजन भतवाल, छोटूभाऊ पोतदार, दिनेश वाघ, फरदीन शेख तसेच मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.
लेबल: कार्यक्रम, जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, सामाजिक
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, शैक्षणिक
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- दिनांक 21/04/2026 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक, धुळे मा. श्री. श्रीकांत धिवरे (IPS) यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर बदली झाल्याने ते कार्यमुक्त झाले होते.
त्यानंतर गृह विभागाचे आदेशाने मा.श्री. विशाल आनंद (IPS) यांची अमरावती ग्रामीण ते धुळे जिल्हा अशी बदली झाली असुन, दि.04/05/2026 रोजी सायंकाळी 06.00 वा. मा. श्री. विशाल आनंद (IPS) यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, पोलीस उप अधीक्षक श्री. ज्ञानेश्वर जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वजित जाधव, श्री. राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पवार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. विनोद पाटील, सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. अभिजित सोनवणे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. मुकेश माहुले व शहर वाहतुक शाखेचे सपोनि. प्रशांत महाले असे उपस्थित होते.
मा.श्री. विशाल आनंद (IPS) हे सन 2014 तुकडीचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी असून, ते महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापुर्वी नागपूर ग्रामीण व अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणुन काम पाहिले आहेत्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (IITR) मधुन इलेक्ट्रिकल इंजिनियरींग शिक्षण घेतले आहे. त्यांचा सामुदायिक पोलीसींग, जातीय सलोखा राखणे आणि ग्रामीण भागातील गुंतागुंतीच्या तपासांचे व्यवस्थापन यावर विशेष भर आहे.
लेबल: जनसंघर्ष न्यूज, जिल्हा, विशेष, शहर
लेबल: जनसंघर्ष न्यूज, महाराष्ट्र, सामाजिक