शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

शिरढाने प्र. डांगरी येथे वीज कोसळून गाय ठार शासनाने मदत द्यावी - शेतकरी समाधान पाटील

 

शिरढाने प्र. डांगरी येथे वीज कोसळून गाय ठार शासनाने मदत द्यावी - शेतकरी समाधान पाटील 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी 

धुळे तालुक्यातील शिरढाने प्र. डांगरी येथील शेतकरी समाधान पाटील यांची गाय वीज कोसळून ठार झाली आहे. यासंदर्भात शेतकरी पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळविले आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

पुढील वृत्त असे कि, धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे नद्या, नाल्याना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच दि. 31 जुलै शुक्रवार रोजी पहाटे झालेल्या पावसात धुळे तालुक्यातील शिरढाने प्र. डांगरी येथील शेतकरी समाधान पाटील यांच्या शेती परिसरात बांधलेल्या गायीवर वीज कोसळली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची शेतकरी पाटील यांनी प्रसासकीय अधिकारी तलाठी यांना माहिती. तरी तलाठी यांनी तत्काळ प्राथमिक अहवाल लिहून घेतला आहे. 

प्रतिक्रिया - 

माझ्या शेतात बांधलेली गायीचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. माझे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी. 

समाधान पाटील, शेतकरी ( शिरढाने प्र. डांगरी )

लेबल: ,

मंगळवार, २८ जुलै, २०२६

पाटचारीचे काम पूर्ण करण्यासह सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडा, अन्यथा आंदोलन ; कापडणेतील शेतकऱ्यांचा इशारा.

पाटचारीचे काम पूर्ण करण्यासह सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडा, अन्यथा आंदोलन  ; कापडणेतील शेतकऱ्यांचा इशारा.









जनसंघर्ष न्यूज 

तालुक्यातील कापडणे व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सोनवद प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पांझरा नदीवरील पाटचारीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची मागणी करत जिल्हा प्रशासन आणि सिंचन ( पाटबंधारे) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की रेल्वे प्रशासनाच्या कारणामुळे पाटचारीचे खोदकाम करण्यात आले असून संरक्षक भिंतीही तोडण्यात आल्या आहेत.मात्र संबंधित काम अद्याप पूर्ण झालेले नाही.यामुळे सोनवद प्रकल्प भरण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .प्रकल्प भरला नाही तर कापडणे व परिसरातील हजारो नागरिकांच्या पुढील आठ महिन्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता भिती व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पाटचारीची तत्काळ संयुक्त पाहणी करावी. संरक्षक भिंत व पाटचारीचे काम तातडीने पूर्ण करावे. सोनवद प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची हमी देणे , संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची चौकशी करून आवश्यक कारवाई करणे तसेच कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प वेळेत भरण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाची जबाबदारी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर शरद पाटील, दिलीप पाटील,योगेश पाटील,कल्पेश पाटील,नवल पाटील,भगवान पाटील, भिका पाटील,उत्तम माळी , प्रकाश चौधरी,कल्पेश पाटील, जयवंत पाटील , प्रभाकर पाटील ,प्रकाश पाटील,प्रल्हाद पाटील,चिंधू लोहार,प्रकाश माळी,प्रशांत पाटील,आबा पाटील,विलास पाटील,संजय जैन ,मनोहर माळी, दीपक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सोमवार, २७ जुलै, २०२६

दिल्लीतील यशानंतर धुळ्यात विद्यार्थ्यांची भव्य 'विजय तिरंगा रॅली'; राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी.

 

दिल्लीतील यशानंतर धुळ्यात विद्यार्थ्यांची भव्य 'विजय तिरंगा रॅली ' ; राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी.

जनसंघर्ष न्यूज 

​धुळे: नवी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या ऐतिहासिक यशानंतर त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धुळे शहरात 'तिरंगा संघर्ष समिती'च्या वतीने एका भव्य 'विजय तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरून मार्गस्थ झाली. या लक्षवेधी रॅलीमध्ये तब्बल ६०० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज सर्वांचे आकर्षण ठरला असून, यात विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रस्त्यावर मोठे शक्तीप्रदर्शन केले.

​दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा हा लोकशाहीतील विद्यार्थी एकजुटीचा मोठा विजय असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. याच विजयाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातही 'टीईटी'सारख्या महत्त्वपूर्ण परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या गैरप्रकारांचा संताप व्यक्त करत, आता राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीही तातडीने राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी या रॅलीतून करण्यात आली आहे. हा लढा इथेच थांबणार नसून, विद्यार्थ्यांच्या या वाढत्या रोषामुळे आणि राज्य सरकारला दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे आता राज्याचा शिक्षण विभाग यावर कोणती ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

लेबल: ,

बुधवार, २२ जुलै, २०२६

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे तीव्र निषेध

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मनसेतर्फे तीव्र निषेध.




.





जनसंघर्ष न्यूज 


दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यावर आणि पालकांवर करण्यात आलेला निर्दयी लाठीहल्ला हा जालीनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा ठरला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना या हल्ल्याच्या तीव्र निषेध करीत असून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात तीव्र आंदोलन सुरू करेल. असा इशारा देत आज धुळ्यात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस अजितसिंग राजपुत यांनी केंद्र सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दात विरोध नोंदवला.
येथील क्यूमाईन क्लब समोर मनसेच्या  पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत दिल्लीतील लाठीमार आणि विरोधकांवरील पोलीस कारवाईचा निषेध केला.यावेळी मनसेच्या नेत्या प्राची कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम ,जिल्हा सरचिटणीस अजितसिंग राजपुत,संदीप जडे,तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी, राजेश दुसाणे, दीपक बच्छाव, रामकृष्ण वाघ,योगेश पाटील, मनविसेचे गौरव गिते,विजय मिस्तरी,हर्षल यादव , देवा कोळी ,नितीन कोळी,सचिन खोपडे,मोहन राजे शिंदे,ईश्वर वाघ,सतीश पाटील,बापू जगन्नाथ ठाकूर,अमोल जगन्नाथ ठाकूर,योगेश सैंदाणे, शामक दादाभाई, उज्वला कोतवाल ,आदी आंदोलनात सहभागी झाले.

मंगळवार, २१ जुलै, २०२६

कारवाई; तीन मोटारसायकल चोर जेरबंद, दोन गुन्ह्यांची उकल


 चाळीसगावरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन मोटारसायकल चोर जेरबंद, दोन गुन्ह्यांची उकल

दोन चोरीच्या मोटारसायकली व २० हजारांची रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एक आरोपी फरार

जनसंघर्ष न्यूज 

धुळे - चाळीसगावरोड पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना निष्पन्न केले असून, त्यांच्याकडून दोन चोरीच्या मोटारसायकली व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उमर इरफान मन्सुरी व फरदीन शेख लतीफ या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली.

या कारवाईत चोरीच्या दोन मोटारसायकली (एकूण किंमत १ लाख रुपये) तसेच २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील हमीद रशीद अन्सारी हा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

लेबल:

सोमवार, २० जुलै, २०२६

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..


सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

जनसंघर्ष न्यूज 

धुळे- महान पर्यावरणवादी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे पुरस्कर्ते तसेच मेगसेसे पुरस्काराने सन्मानित सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंच, धुळे यांच्या वतीने सोमवार दि. २० जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. निट पेपरफुटी प्रकरण तसेच शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात सोनम वांगचुक यांनी लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने उपोषण सुरू केले होते. मात्र, शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून १८ जुलै रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना उपचाराच्या कारणास्तव ताब्यात घेतल्याचा तसेच आंदोलनातील कार्यकर्त्यांनाही अवमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पुरोगामी विचार मंचाने केला. या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर योग्य कारवाई करावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी पुरोगामी विचार मंचाचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे उपाध्यक्ष गो. पी. लांडगे, प्रा. बाबा हातेकर, जी. डी. जाधव, पंडित गोसावी, पी. टी. बेडसे, मनोहर मोहीते, कॉ. एल. आर. राव, बी. ए. पाटील, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, हेमंत मदाने, विश्वास पगार, डॉ. पापालाल पवार, दरबारसिंग गिरासे, किशोर शेजवळ, एम. एच. मोहीते, गुलाब मोरे, रामकृष्ण शिंदे, बबनराव वानखेडे, दिपक सोनवणे, दिनेश निमोणकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, तालुका सचिव कैलास देसले, तालुकाध्यक्ष नितीन जाधव आदी उपस्थित होते. तसेच मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, नवल ठाकरे, मोहंमद जैद, आसिफ शेख, सादिक शेख यांच्यासह संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल: ,

शुक्रवार, १० जुलै, २०२६

१०० टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकांचा विराट मोर्चा ; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

१०० टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकांचा विराट मोर्चा ; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

जनसंघर्ष न्यूज 

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद सामूहिक रजा आंदोलनाला धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जिल्हा परिषद खासगी प्राथमिक व महानगरपालिका शाळांतील शिक्षकांनी शंभर टक्के शाळा बंद ठेवून सामूहिक रजा घेत आंदोलनात सहभाग नोंदविला.यानंतर कर्मचारी कल्याण भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा  काढण्यात आला.शिक्षक संघटनाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा .अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा देण्यात आला. निवेदनात टीईटी परीक्षा सी रद्द करणे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द अथवा सुधारित करणे. बीएलओची कामे शिक्षकांऐवजी इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडे सोपिवणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे तसेच टीईटी संदर्भांत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता.या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक , खासगी प्राथमिक व महानगरपालिका शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला. क्यूमाईन क्लब येथे धरणे आंदोलनानंतर मोर्चा काढण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, शिवानंद बैसाणे, बाळासाहेब बोरसे,शरद सूर्यवंशी,विजय खैरनार, संजय पोतदार,भूपेश वाघ, राजेंद्र नांद्रे, संजय शिंदे, विनोद पाटील, प्रवीण भदाणे, रवींद्र बोरसे,बापू पारधी, मुरलीधर शिंदे, नवीनचंद्र भदाणे, राजेंद्र भामरे, मिलिंद वसावे, जगदीश बडगुजर, ज्ञानेश्वर पवार, विजय ढोबळे, शरद पवार, विजयकुमार देसले, कमलाकर बच्छाव, रुपेश जैन, ज्ञानेश्वर कक्कर, गमन पाटील, माझे मिर्झा,गोकुळ सोनार,मनोज निकम ,छोटू राजपूत,संदीप पवार, शामकांत अहिरराव,पंडित पाटील, विश्वनाथ सोमवंशी ,प्रभाकर मेटेकर,सुरेंद्र पिंगळे ,शरद पाटील,ऋषिकेश कापडे,गिरीश बागुल ,संदीप मराठे,संदीप नेरे,अनिल तोरवणे,ईश्वर ठाकरे, तुकाराम बहिरम , गजानन जाधव , दत्तात्रय पाटील,नितीन सासके , अशोक बडगुजर,संतोष जाधव,अविनाश काकुळदे ,भूषण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर,विलास पाटील, राकेश केदार,धर्मसिंग पावरा,विशाल परदेशी ,रविंद्र पवार ,भास्कर परदेशी,वंदना सावंत,तृप्ती राजपूतकर,ज्योती वराडे, रेखमा पाटील,रुपाली सोनवणे , ज्योत्स्ना सनेर , छाया परदेशी ,पल्लवी मांडोळे, दीपाली पवार,प्रतिमा वाघ,दीपा मोरे,चेतना परदेशी ,यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी व शेकडो शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल: , ,

बुधवार, ८ जुलै, २०२६

₹१.५२ कोटींचा वृक्षलागवड घोटाळा ? उच्च न्यायालयात रिट याचिका चौकशीची ऍड ऋतुराज वाघ यांची मोठी मागणी


 ₹१.५२ कोटींचा वृक्षलागवड घोटाळा ? उच्च न्यायालयात रिट याचिका चौकशीची ऍड ऋतुराज वाघ यांची मोठी मागणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी :

पालधी–अमळनेर–शिंदखेडा–नंदुरबार या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या सुमारे ₹१.५२ कोटींच्या वृक्षलागवड व तीन वर्षांच्या संगोपनाच्या कामात कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

ही याचिका धुळे येथील अॅड. ऋतुराज दिवंगर वाघ यांनी दाखल केली असून, राज्य शासन, जिल्हाधिकारी धुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित कंत्राटदार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

याचिकेनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने पालधी–अमळनेर–शिंदखेडा–नंदुरबार मार्गावर वृक्षलागवड व तीन वर्षांच्या संगोपनाचे काम मंजूर केले होते. या कामासाठी सुमारे ₹१.५२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत अनेक ठिकाणी अपेक्षित प्रमाणात वृक्षलागवड झालेली नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्यांनी न्यायालयात स्थळछायाचित्रे, भू-टॅग केलेले फोटो, Google Map लोकेशन आणि इतर पुरावे सादर केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, प्रत्यक्ष काम पूर्ण न होता काम पूर्ण झाल्याचे दाखवून संबंधित बिले अदा करण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

या संदर्भात यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र, कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने अखेर उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

रिट याचिकेत संबंधित कामाची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर नियमानुसार निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुनावणी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होण्याची अपेक्षा असून, या निकालाकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लेबल:

धुळेसह राज्यभरात 'लँड जिहाद'चे संघटित रॅकेट? आमदार अनुप अग्रवाल यांचा विधिमंडळात गंभीर आरोप; एसआयटी चौकशीची मागणी.



धुळेसह राज्यभरात 'लँड जिहाद'चे संघटित रॅकेट?

 आमदार अनुप अग्रवाल यांचा विधिमंडळात गंभीर आरोप; एसआयटी चौकशीची मागणी.

जनसंघर्ष न्यूज 

धुळे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात कृषी जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर मुद्दा आज राज्य विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे.

धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधत, हा प्रकार संघटित स्वरूपातील 'लँड जिहाद' असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमदार अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी नसताना बनावट शेतकरी दाखले, खोटे ७/१२ उतारे, इतर राज्यांतील जमिनींचे कागदपत्र, बनावट वारस, तसेच शासनाच्या जमिनींच्या व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल बुडविण्यात आला आहे. धुळे शहरातील देवपूर, वडजाई, पिंपरी आणि नरव्हाळ परिसरातील अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला.

यासोबतच या व्यवहारांमध्ये मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याने निधीचा स्रोत आणि परदेशी निधीचा वापर झाला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले की, राज्यभर अशा प्रकारच्या जमिनींच्या व्यवहारांची तपासणी सुरू असून, जमाबंदी आयुक्तांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे राज्यातील कृषी जमीन व्यवहारांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले असून, आता शासनाची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जन संघर्ष न्यूज, मुंबई/धुळे.

लेबल: , , ,

धुळे शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा; विशेष पथक स्थापन करण्याची युवा सेनेचे ॲड. पंकज गोरे यांची मागणी

 


धुळे शहरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा; विशेष पथक स्थापन करण्याची युवा सेनेचे ॲड. पंकज गोरे यांची मागणी

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांना निवेदन सादर केले ; तातडीच्या कारवाईचे आश्वासन

जनसंघर्ष न्यूज 

   धुळे, दि. ७ (प्रतिनिधी): धुळे शहरातील वाढते अवैध धंदे, गुंडगिरी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांची भेट घेऊन युवासेना राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी सविस्तर निवेदन सादर केले.

    निवेदनात धुळे शहरातील सट्टा, पत्त्यांचे क्लब, अवैध दारू अड्डे व इतर बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी विशेष स्कॉड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर सातत्याने देखरेख ठेवणे, गुंडांची परेड घेणे, जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे आणि समाजकंटकांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची मागणीही करण्यात आली.

    सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दहशत निर्माण करणारे व्हिडिओ व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होत असल्याने त्यांच्यावर आवश्यक निर्बंध घालावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

    महिलांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक अधिक सक्रिय करावे तसेच छेडछाडीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

      नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या "कायद्याचा बालेकिल्ला" या मोहिमेच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातही विशेष मोहीम राबवून अवैध धंदे, गुंडगिरी आणि समाजकंटकांविरोधात सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी ॲड. पंकज गोरे यांनी केली.

      यावेळी ॲड. पंकज गोरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार केला. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत येनपुरे यांनी संबंधित बाबींवर तातडीने कारवाई करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

लेबल: , , ,

मंगळवार, ७ जुलै, २०२६

महिला बचत गट योजनांतील कथित गैरव्यवहाराची SIT चौकशीची मागणी; १३ जुलैपासून आंदोलनाचा इशारा

महिला बचत गट योजनांतील कथित गैरव्यवहाराची SIT चौकशीची मागणी; १३ जुलैपासून आंदोलनाचा इशारा 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमार्फत राबविण्यात आलेल्या ग्रामीण जीवन उन्नती अभियान (UMED) व मानव विकास योजना 2022-23 अंतर्गत महिला बचत गटांसाठी पुरविण्यात आलेल्या मशिनरी खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि पुरवठादार कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र SIT किंवा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यामार्फत वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात शासन निधीचा अपहार, निकृष्ट दर्जाची मशिनरी पुरवठा, महिलांची फसवणूक, चौकशीची दिशाभूल, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तसेच तक्रारदार महिलांवर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

तक्रारदारांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी व पुरवठादार कंपनीची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे, आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे आणि तक्रारदार महिला व साक्षीदारांना संरक्षण द्यावे, अशा मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, आरोपांबाबत संबंधित अधिकारी किंवा संबंधित कंपनीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. 

तसेच, आठ दिवसांत चौकशी सुरू न झाल्यास सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून दक्ष पत्रकार संघाच्या वतीने महिला बचत गटांच्या सदस्यांसह धरणे, भजन, आमरण उपोषण व बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

लेबल: , ,

सोमवार, ६ जुलै, २०२६

मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांचा इशारा : 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन

 



मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांचा इशारा : 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी
      राज्यातील कार्यरत शिक्षकांवरील वाढत्या प्रशासकीय भार, पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे, TET अनिवार्यता तसेच शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

      निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पदोन्नती प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणी दूर करून पात्र शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी TET परीक्षेची सक्ती रद्द करावी, उत्तर प्रदेश व तेलंगणा राज्यांच्या धर्तीवर सवलती लागू कराव्यात, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नतीसंदर्भातील प्रश्न तातडीने निकाली काढावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
निवेदनात शाळा व विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारे संवर्गनाश धोरण रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांकडून निवडणूक व इतर अशैक्षणिक कामे करून घेतली जात असल्याने अध्यापन कार्यावर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
        
       शासनाने शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 9 जुलै रोजी महाराष्ट्रभर शाळाबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

       धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धामक, सचिव चंद्रकांत साटोरा यांच्यासह विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन सादर करण्यात आले.

लेबल: , ,

घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद; शिरपूर शहर पोलिसांची यशस्वी कारवाई

 

घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद; शिरपूर शहर पोलिसांची यशस्वी कारवाई

जनसंघर्ष न्यूज 

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीचा सुमारे ₹74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 जुलै 2026 रोजी रात्री 10.45 ते 2 जुलै 2026 रोजी दुपारी 12.00 या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी घरातून एलईडी टीव्ही, एसी आणि दोन लॅपटॉप असा एकूण ₹74 हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 288/2026 अंतर्गत बीएनएस कलम 305(अ), 331(3) व 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविंद्र राजेंद्र पवार (रा. खुर्दे बुद्रुक, ता. शिरपूर, जि. धुळे) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला एलईडी टीव्ही, एसी व दोन लॅपटॉप असा एकूण ₹74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

शिरपूर शहर पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

लेबल: ,

रविवार, ५ जुलै, २०२६

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात शिंदखेड्यात सर्वपक्षीय बैठक; १३ जुलै रोजी भव्य मोर्चाची घोषणा

 

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात शिंदखेड्यात सर्वपक्षीय बैठक; १३ जुलै रोजी भव्य मोर्चाची घोषणा

जनसंघर्ष न्यूज 

शिंदखेडा | प्रतिनिधी

आज, दि. ५ जुलै २०२६ रोजी शिंदखेडा येथील नगरसेवक राहुल भाऊ पाटोळे यांच्या संपर्क कार्यालयात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती, शिंदखेडा तालुका यांच्या वतीने सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात समितीची स्थापना करण्यात आली असून, दि. १३ जुलै २०२६ रोजी शिंदखेडा येथे भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील (एससी) विविध समाजबांधवांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा दि. १३ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वार येथून सुरू होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडी (शिंदखेडा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रिपब्लिकन एकतावादी, आदिवासी समाज, मुस्लिम समाज तसेच विविध बहुजनवादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस रामभाऊ माणिक (दोंडाईचा नगरसेवक), राहुल भाऊ पाटोळे (शिंदखेडा नगरसेवक), दीपक अहिरे (शिंदखेडा नगरसेवक), अक्षय चव्हाण (दोंडाईचा नगरसेवक), अरविंदकुमार मंगासे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन एकतावादी), संजय पाटोळे (जिल्हा उपाध्यक्ष, आरपीआय), कैलास आखाडे (तालुकाध्यक्ष), प्रवीण मनसे (युवक जिल्हाध्यक्ष), मनोज पानपाटील (पँथर सेना तालुकाध्यक्ष), जतिन बोरसे, विजय मोरे, श्रीकांत बैसाणे, बाळा इशी, नवनीत बागले, रोहित पाटोळे, संजय पानपाटील, रवींद्र इशी, रावसाहेब पाटोळे, किरण शिरसाट, मनोज बोरसे, दीपक बोरसे, सागर बोरसे, अजय पाटोळे, बबलू कापुरे, तोसीब शेख, सोनू कुंभार, सिद्धार्थ कुवर, कुणाल पाटोळे, यशवंत पाटोळे यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील आंबेडकरी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात लोकशाही मार्गाने व्यापक जनजागृती करत १३ जुलैचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

लेबल: , , ,

शनिवार, ४ जुलै, २०२६

२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 

२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

एक आरोपी अटकेत; ५४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, दोन फरार आरोपींचा शोध सुरू

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी :

चाळीसगाव रोड पोलिसांनी जबरी चोरी व मारहाणीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत चार आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोबाईल, रोकड व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

३० जून २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धुळे शहरातील शंभर फूटी रोडवरील शासकीय दूध डेअरीजवळ फिर्यादीला अडवून मारहाण करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल, चार हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच मोबाईलद्वारे ऑनलाइन ९०० रुपये ट्रान्सफर करून पोबारा केला.

या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विवेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत एकाला अटक केली.

अटकेतील आरोपीकडून चोरीस गेलेला मोबाईल, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत फरार आरोपींना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू ठेवली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पवार तसेच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

लेबल: ,

धुळ्यात विनापरवाना गुंगीकारक कफ सिरपची वाहतूक उधळली; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 


धुळ्यात विनापरवाना गुंगीकारक कफ सिरपची वाहतूक उधळली; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

शिरपूर येथील संशयिताकडून 18 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त; NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी

धुळे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुंगीकारक औषधांची विनापरवाना विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत शिरपूर येथील एका संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत 18 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 160 बाटल्या गुंगीकारक कफ सिरप जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 3 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदखेडा शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात सापळा रचला. यावेळी किरण वसंत सकटे (रा. मच्छीबाजार, शिरपूर) याच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता Codeine Phosphate आणि Triprolidine Hydrochloride घटक असलेल्या Conez TR या कफ सिरपच्या 100 मिलीच्या 160 बाटल्या आढळून आल्या.

सदर औषधांची एकूण किंमत 18 हजार 400 रुपये असून संबंधिताकडे त्याबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 164/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 278, तसेच अंमली औषधी व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) 1985 आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. दीपक ठोके करीत असून आरोपीने ही औषधे कोठून आणली व त्यामागील रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सपोनि. दीपक ठोके व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लेबल: ,

धुळ्यात ६ जुलैला हास्याचा महाधमाका; रंगदेवता थिएटर्सतर्फे 'ऑल दि बेस्ट' नाटकाचा प्रयोग

 


धुळ्यात ६ जुलैला हास्याचा महाधमाका; रंगदेवता थिएटर्सतर्फे 'ऑल दि बेस्ट' नाटकाचा प्रयोग

६ जुलै रोजी रात्री ८ वाजता हिरे भवन येथे रंगणार मराठी रंगभूमीवरील गाजलेले नाटक; पत्रकार परिषदेत माहिती

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी

मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक गाजलेल्या आणि प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासोबतच अंतर्मुख करणाऱ्या 'ऑल दि बेस्ट' या नाटकाचा विशेष प्रयोग रविवार, दि. ६ जुलै रोजी रात्री ८ वाजता धुळ्यातील हिरे भवन येथे रंगणार आहे. रंगदेवता थिएटर्सतर्फे या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून, याबाबतची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते चंद्रशेखर पाटील आणि भटू चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, 'ऑल दि बेस्ट' हे मराठी रंगभूमीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेले नाटक आहे. हे नाटक केवळ विनोदी नसून, मानवी स्वभाव, मैत्री, संघर्ष आणि भावनिक नातेसंबंध यांचे प्रभावी चित्रण करणारे आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश हे नाटक देते.

नाटकातील चपखल संवाद, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, पात्रांमधील अप्रतिम ताळमेळ आणि अचूक टायमिंग ही या नाटकाची जमेची बाजू आहे. तीन वेगवेगळ्या स्वभावाच्या मित्रांची कथा आणि संकटाच्या काळात त्यांनी एकमेकांना दिलेली साथ प्रेक्षकांना भावनिकरीत्या जोडून ठेवते. त्यामुळेच हे नाटक अनेक वर्षांपासून रसिकांच्या पसंतीस उतरले असून आजही तेवढ्याच उत्साहाने पाहिले जाते.

'मैत्री, प्रेम आणि निखळ हास्य' यांचा सुंदर संगम असलेले हे नाटक संपूर्ण कुटुंबासह अनुभवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान, नाटकाच्या तिकिटांची विक्री शिवतीर्थ, संतोषी माता चौक, जैन मंदिरासमोर तसेच हिरे भवन येथे सुरू आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर पाटील यांच्याशी मो. 91702052338 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

लेबल: , ,

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

​धुळ्यात 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकावरून वाद; बॅनर्सची तोडफोड, प्रयोगावर बंदी घालण्याची मागणी

धुळ्यात 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकावरून वाद; बॅनर्सची तोडफोड, प्रयोगावर बंदी घालण्याची मागणी

अधिक वाचा »

लेबल: , , ,

गुरुवार, २ जुलै, २०२६

केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांना समाजभूषण सुभाष बोराडे यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन


केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांना समाजभूषण सुभाष बोराडे यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन

कुंभमेळा नियोजन समितीत समावेश, समाजभूषण पुरस्कार देशभर लागू करण्यासह पाच प्रमुख मागण्या; सकारात्मक आश्वासन

जनसंघर्ष न्यूज 

नाशिक | प्रतिनिधी

     नाशिक येथील देवळाली कॅम्प सिंधी पंचायत समिती हॉल येथे दि. २६ जून २०२६ रोजी केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांच्या शासकीय दौऱ्यादरम्यान समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांनी विविध सामाजिक व प्रशासकीय मागण्यांचे निवेदन सादर केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले.

     निवेदनात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थींना सदस्य म्हणून नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशातील सर्व राज्यांमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सुरू करावा, अशी मागणीही करण्यात आली.

      याशिवाय नाशिक महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कायमस्वरूपी नोकरभरती करावी, नाशिक महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व शाळांचे पुनर्वसन करून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून द्यावे, तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला.

       यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भगवत मकवाना यांनी निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या शासन स्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांना केंद्रीय समितीवर सदस्य म्हणून संधी मिळावी यासाठीही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

       यावेळी रिपाई (आठवले) नाशिक जिल्हा उपाध्यक्ष समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे, संजय जाधव, आकाश घुसळे, रोहित सुनील भालेराव, विक्रांत बागुल, जेष्ठ नेते जमिलभाई सैय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजसेवक उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर राजीव बिरसिंग रजोरा, भगवान कटारिया, राकेश बैद, संजय कल्याणी, निलेश बंगाली आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

लेबल: , ,

आमदार चेतन वसावा यांना राजकीय षडयंत्रपूर्वक खोटे केस मध्ये अडकवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करून आमदार वसावा यांना मुक्त करा - भिल समाज विकास मंच ची मागणी.


 

आमदार चेतन वसावा यांना राजकीय षडयंत्रपूर्वक खोटे केस मध्ये अडकवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करून आमदार वसावा यांना मुक्त करा - भिल समाज विकास मंच ची मागणी.

जनसंघर्ष न्यूज 

एरंडोल प्रतिनिधी - येथील भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आमदार चेतन वसावा यांच्यावर राजकीय षडयंत्रपूर्वक खोट्या केसेस मध्ये अडकवून त्यांना अटक करण्यात आली असल्याची बातमी ऐकुन आमदार वसावा यांना अडकवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यां ची एस आय टी चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन एरंडोल प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना देण्यात आले.

        निवेदनात आदिवासी आवाज या न्यूज चॅनलवरील व्हिडिओ तसेच वर्तमानपत्रातील मजकूर वरील माहितीचे अवलोकन केले असता गुजरात मधील डेडियापाडा येथील आदिवासी आमदार चेतन वसावा यांना 2023 मधील कथित प्रकरणात जिल्हा न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आमदार चेतर वसावा यांच्या सकट त्यांच्या सात दिवसाची बाळंतीण पत्नी व सात दिवसाचे निरागस बालकाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे वृत्तपत्र व सोशल मीडियावर माहिती फिरत आहे तसेच दुसऱ्या बाजूला संपूर्ण भारतात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये काही महिन्यापूर्वी ते भाषणात सांगत आहेत की मला बीजेपी या राजकीय पक्षाकडून धमक्या येत आहेत ते मला त्यांच्या पक्षात सामील करण्यासाठी दबाव आणत आहे मी बीजेपी या पक्षात सामील नाही झालो तर मला फसवून संपवतील असा व्हिडिओ फिरत आहे म्हणून आम्हाला समस्त आदिवासी समाजाला व लोकशाही वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची एक मागणी आहे की सदर घटनेची एस आय टी स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच वर्तमान मध्ये चेतर वसावा यांना वरील कोर्टात जामीन मंजूर करून त्यांना जेल मधून मुक्त करण्यात यावे अशी मागणी भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

     यावेळी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ, एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे, युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे, लश्मण जावळे, पंढरीनाथ मोरे, सखाराम मोरे, वासुदेव गायकवाड,राजधर सोनवणे,करण सोनवणे, मोतीराम जावळे, हिरालाल सोनवणे,बादल ठाकरे,करण बेलदार,आकाश ठाकरे,अजय बेलदार, कुणाल अहिरे, दिपक सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

लेबल: , , , , ,